सरकारच्या दिमागाची बत्ती गोल..... ?

आघाडी संपुआ सरकारच्या दिमागाची ऐसी तैसी झालेली दिसत आहे. त्याचे कारण त्यांचेच मंत्री आहेत. कारण  प्रत्येक गोष्टीचा विचार विमश लोकांची प्रतिक्रिया घ्यायच्या आधीच निर्णय घेऊन गोत्यात येत आहे मग  महागाई असो कि. लोकपाल बिल, किंव्हा सध्याचा गाजत असलेला FDI  चा मुद्दा असो. योग्य तो निर्णय (जनहिताचा) न घेता  भलताच निर्णय घेत आहे. तिकडे अन्ना हजारे आपल्या मुद्द्यावर ठाम असताना त्यांना हुलथापा देताना सरकार दिसत आहे कधी याला लोकपालाच्या कक्षेत घ्यायचे कि नाही हे ज्या सरकारला कळत नाही मग खरच त्यांचा दिमाग जाग्यावर आहे का?. हा प्रश्न लोकांसमोर उभा आहे. आधी श्रेणी ४ च्या अधिकाऱ्यांना लोकपालाच्या कक्षेत घेण्यात आले व लगेच दुसऱ्या दिवशी न घेण्याचा निर्णय घेतला. काय सरकार आहे. वा!
तसेच सध्या संसदेच हिवाळी अधिवेशन सुरु आहे मात्र आज ८ दिवस होऊनही एकही दिवशी संसद सुरळीत चालेले नाही. फ़क़्त लोकांचा पैसा वाया घालताना हे सरकारचे मंत्री व सरकार दिसत आहे. लोकांच्या घामाच्या पैश्याची किमंत यांना काय कळणार.
आता तर अन्ना हजारेना  पुन्हा उपोषणाची पाळी येणार कि काय? असे चित्र दिसत आहे, सरकार ने मागे झालेल्या रामलीला मैदानावर कबुली दिली होती कि संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आम्ही चांगले कठोर लोकपाल विधेयक पारित करू परंतु. हिवाळी अधिवेशनाला ८ दिवसाचा कालावधी लोटला असून दररोज संसदेत गदारोळ सुरूच आहे.
या वरून सरकारला सामान्य लोकाबाद्दलाच पडलेला विसर साफ दिसत आहे. 
Previous Post Next Post
Dhiraj Manmode'S Blog
Dhiraj Manmode'S Blog